Monday, 24 January 2022

🇮🇳 १५ ऑगस्टचे ध्वजारोहण आणि २६ जानेवारीचे ध्वज फडकवणे यांमधील मुख्य फरक ...


१) १५ ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर ... २६ जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात; कारण देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपतीपद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     
************                                                                      

२) १५ ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर... २६ जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला इंग्रजीत (flag unfurling) म्हणतात. 
************   

३) १५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर... २६ जानेवारी १९५० ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात. ***************    

४) १५ ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर, २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा
फडकवला जातो.
 आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

🙏 वंदे मातरम 🇮🇳

No comments:

Post a Comment