Saturday, 26 February 2022

मराठी राजभाषा दिन, मराठी राजभाषा दिन आणि जागतिक मातृभाषा दिन

१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.          महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला.१ मेेे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असताना वसंतराव नाईक यांनी मांडलेले मराठी भाषा दिनाबाबतचे विचार प्रेरक होते. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली. 

राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी भाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. तर २१ फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१०मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले आहे. 


Sunday, 6 February 2022

बिहार राज्यातील "तीन वेडे" IAS अधिकारी : संतोषकुमार, विजयकुमार व रंजन प्रकाश

*बिहार राज्यातील "तीन वेडे" IAS अधिकारी. २०१९ मध्ये आपल्या गावात सुरू केली नि:शुल्क पाठशाला*
       -----🙏🙏🙏-----
[ *तिन्ही अधिकारी शिक्षक पगार  व स्टडी मटेरियलवर होणारा खर्च स्वतःच्या पगारातून पदरमोड करून करतात. स्वत: सुट्टीत येऊन अध्यापनही करतात*]
[{ *तिन्ही अधिकारी बाहेरच्या राज्यात सेवा करत असूनही बिहारकडे त्यांचे लक्ष आहे.*}]
(( *शिक्षणाचा हक्क सर्वांना आहे. तो मिळाला पाहिजे म्हणून  गावात नि:शुल्क शाळा काढली.*))
( *संतोषकुमार (२०१४ IAS) अरुणाचल प्रदेश मध्ये, विजयकुमार उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे तर रंजन प्रकाश असम येथे कार्यरत आहेत.*)
{ *आंबेडकर इनिशिएटिव फॉर दी मर्जिन लाइज्ड (AIM) नावाने शैक्षणिक कार्य सुरू केले.*}
[[ *समस्तीपुर गोपालगंज एवं औरंगाबाद जिल्ह्यातील बसंतपुर  येतील रमणी गावात  सामाजिक दायित्व म्हणून शाळा सुरू केली. दोन वर्षांत सामान्य कुटुंबातील ५५० विद्यार्थी नि:शुल्क शिक्षण घेत आहेत. जवळपास ४०% मुली शिक्षण घेत आहेत. या मुलांना स्टडी मटेरियल व मोफत ट्यूशनसुद्धा दिली जाते.*]]
(( *संतोषकुमार यांनी समस्तीपुर बसंतनगर येथील रमनी गावात, विजयकुमार यांनी गोपालगंज पिठौरी गावात तर रंजन प्रकाश यांनी औरंगाबाद येथील तरारी गावात शाळा सुरु केली आहे ‌.*))
{{ *वरील तिन्ही गावात नेमलेल्या शिक्षकांचा पगार व स्टडी मटेरियल व अन्य खर्च तिन्ही IAS अधिकारी पगारातून करतात. दरमहा ते ठराविक पगारातील रक्कम यासाठी बाजूला काढून ठेऊन खर्च करतात. सुट्टीत येऊन ते अध्यापनसुद्धा करतात.*}}
[[[ *संतोषकुमार , विजयकुमार व रंजन प्रकाश यांनी शिक्षण घेऊन UPSC परीक्षेत यश मिळवले आहे. आपण मोठे झाल्यावर मागे वळून बघितले पाहिजे. बिहारमधील मुले प्रज्ञावंत आहेत. गरिबीमुळे शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी गावात नि:शुल्क शाळा काढण्याचा निर्णय घेतला. शाळेत गेल्याशिवाय शिक्षणाचे महत्त्व समजणार नाही असे तिघांना वाटत होते. संतोष व विजय हे बॅचमेट आहेत.*]]]
((( *बिहारमधील एका वेळी १९ मुले IAS अधिकारी झाली आहेत. ही बिहारची संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे. संतोषकुमार, विजयकुमार व रंजन प्रकाश यांच्यासारखे बिहारच्या मातीतले "महावेडे",  "संवेदनशील" व समाजऋण फेडणारे अधिकारी असतील तर  बिहार हा नेहमीच देशात अव्वल स्थान पटकावणार आहे यात शंकाच नाही.*)))
{{{ *IAS होऊन राज्याबाहेर नोकरी करत असतानाही तिन्ही अधिकाऱ्यांचे लक्ष मात्र आपल्या बिहार राज्याकडे आहे. हे समाजभान व‌ मातीवर असणारे प्रेम आहे.*}}}
[[[[ *या तिन्ही अधिकाऱ्यांना परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना!*]]]]
संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Tuesday, 25 January 2022

*चौथी पोळी*

           पत्नीच्या मृत्यूनंतर, रामेश्वरचे सकाळी आणि संध्याकाळी आपल्या मित्रांसह गप्पाटप्पा करून उद्यानात फिरणे नेहमीचे ठरले होते.

        तसा घरात त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता, प्रत्येकजण त्याची खूप काळजी घेत असे. 

           आज सर्व मित्र शांत बसले होते, एका मित्राला त्याच्या घरच्यांनी वृद्धाश्रमात पाठवल्याबद्दल दुःखी होते.

       "तुम्ही सर्वजण मला नेहमी विचारत असता मी देवाला तिसरी पोळी कशासाठी मागतो...? आज मी सांगेन" रामेश्वर बोलला...!

        "सून तुला फक्त दोनच पोळ्या देते का...?"

एका मित्राने मोठ्या उत्सुकतेने विचारले...!

"नाही यार...!

असं काही नाही,सून खूप छान आहे. वास्तविक *_पोळी_* चार प्रकारची असते.

       पहिल्या *मजेदार* पोळीमध्ये *आईची ममता आणि वात्सल्य* भरलेले असते. जिच्या सेवनाने पोट तर भरते, पण मन कधीच भरत नाही.

        एक मित्र म्हणाला, "शंभर टक्के खरं आहे,पण लग्नानंतर आईची भाकरी क्वचितच उपलब्ध असते."

       "दुसरी पोळी ही पत्नीची आहे, ज्यामध्ये *आपुलकी आणि समर्पणाची भावना आहे,* जी *पोट आणि मन* दोन्ही भरते." तो पुढे म्हणाला, 

      "आम्ही असा विचार केलाच नाही, मग तिसरी पोळी कोणाची आहे...?" एका मित्राने विचारले.

       "तिसरी पोळी ही सूनेची आहे, ज्यात "कर्तव्याची" भावना आहे, जी थोडी चव देते आणि पोट देखील भरते, सोबतच चौथ्या पोळीपासून आणि अनेक त्रासांपासून वाचवते."

        तिथे थोडा वेळ शांतता पसरली...!

      "मग ही चौथी पोळी कसली आहे...?"

शांतता मोडून एका मित्राने विचारले...!

        "चौथी पोळी ही कामवाल्या बाईची आहे, जिच्याने आपले पोटही भरत नाही किंवा मनही भरत नाही...! आणि तिच्या चवीचीही हमी नसते."

     मग माणसाने काय करावे...?

       "आईची उपासना करा, बायकोला आपला चांगला मित्र बनवून आयुष्य समाधानाने जगा, सुनेला आपली मुलगी समजून तिच्या लहान-सहान चुकांकडे दुर्लक्ष करा. जर सून आनंदी असेल तर मुलगा देखील तुमची काळजी घेईल.

         "जर परिस्थिती आम्हाला चौथ्या पोळीपर्यंत आणते, तर देवाचे आभार माना, की त्याने आपल्याला जिवंत ठेवले आहे, आता चवीकडे लक्ष देऊ नका, फक्त जगण्यासाठी फारच थोडे खावे, जेणेकरुन म्हातारपणाचा प्रवास आरामात पूर्ण जाऊ शकेल." 

   सर्व मित्र शांतपणे विचार करीत होते की, खरोखरच आपण किती भाग्यवान आहोत...!

      (Forwarded By 

Chandrakant Nikade)

चिमण्यांची घरटी आणि गुराखी

श्री टी.एन. शेषन जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त असताना कुटुंबासोबत सुट्टी घालविण्यासाठी मसुरीला जात होते. आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातून बाहेर पडताना त्यांना चिमण्यांनी स्वतःची अनेक सुंदर घरटी झाडांवर बांधलेली त्यांना दिसली.

चिमण्यांची घरटी पाहून त्यांच्या पत्नीने त्यांच्या घराच्या भिंती सजवण्यासाठी दोन चिमण्यांची घरटी असावी अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्यासोबत गेली. पोलिसांनी ताबडतोब तेथे गुरे चारत असलेल्या एका लहान मुलाला बोलावून त्याला दोन चिमण्यांची घरटी झाडांवरून तोडून आणण्यास सांगितले. तेव्हा त्या मुलाने नकारार्थी मान हलवली.

श्री शेषन यांनी त्यासाठी मुलाला 10 रुपये देऊ केले. तरीही, मुलाने नकार दिल्यावर, श्री शेषन यांनी ती रक्कम वाढवून ₹ ५०/- करण्याची ऑफर दिली. तरीही मुलगा राजी झाला नाही. त्यानंतर पोलिसांनी मुलाला धमकावले आणि सांगितले की साहेब न्यायाधीश आहेत आणि तुला तुरुंगातही टाकू शकतात. त्याचे भयंकर परिणाम होतील. 

तो मुलगा श्रीमती आणि श्री शेषन यांच्या गाडीजवळ जाऊन त्यांना म्हणाला, "साहेब, मी तसे करू शकत नाही. त्या घरट्यांमध्ये चिमण्यांची लहान पिल्ले आहेत. त्या पिल्लांची आई अन्नाच्या शोधात बाहेर पडल्या आहेत. त्या जेव्हा परत येतील आणि त्यांना त्यांची मुल दिसणार नाही, तेव्हा त्या चिमण्या खूप दुःखी होतील ज्याचे पाप मी घेऊ शकत नाही."

हे ऐकून श्री टी.एन. शेषन थक्क झाले. श्री शेषन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, – “त्या लहान, अशिक्षित, गुरेढोरे पाळणार्‍या मुलाने उच्चारलेल्या शब्दांपुढे माझे पद, सत्ता आणि आयएएस पदवी क्षणात विरघळली.” पत्नीने घरट्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आणि घरी परतल्यानंतर माझ्या मनात त्या घटनेने अपराधीपणाच्या खोल भावनेने घर केले. 

खरे तर उच्च शिक्षण आणि महागडे ब्रँडेड कपडे घातले म्हणजे माणुसकीचे दर्शन होते असा जर तुमची #समज असेल तर ती साफ चुकीची,खोटी आहे. माणुसकीचे दर्शन हे आंतरिक संस्कारातून जन्माला येते. ममता, इतरांप्रती चांगुलपणाची भावना, फसवणूक न करण्याची भावना तसेच त्या माणसाला कुटुंबातील थोरात मोठ्यांनी दिलेल्या संस्कारातून आणि चांगल्या संगतीतून येते, संगती वाईट असेल तर चांगले गुण येण्याचा प्रश्नच येत नाही. 

Monday, 24 January 2022

🇮🇳 १५ ऑगस्टचे ध्वजारोहण आणि २६ जानेवारीचे ध्वज फडकवणे यांमधील मुख्य फरक ...


१) १५ ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर ... २६ जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात; कारण देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपतीपद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     
************                                                                      

२) १५ ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर... २६ जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला इंग्रजीत (flag unfurling) म्हणतात. 
************   

३) १५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर... २६ जानेवारी १९५० ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात. ***************    

४) १५ ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर, २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा
फडकवला जातो.
 आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

🙏 वंदे मातरम 🇮🇳