गजलेचा फायदा -
गजल रचणे किंवा दुसऱ्याच्या गजलेचा आस्वाद घेण्याचा छंद निर्माण होणे हे माणसाला खूप फायदेशीर ठरते. माणूस आपली परिस्थिती फारशी बदलू शकत नाही. गजल वाचून तर नाहीच नाही. मात्र, गजल वाचून एक मनस्थिती मात्र मिळते ज्यायोगे परिस्थितीकडे पाहायचा दृष्टीकोन बदलू शकतो. याचे कारण पुन्हा हेच आहे की गजल ही एका साध्या माणसाने स्वतःच्या आयुष्यातून निर्माण केलेले काव्य असते. त्यामुळे त्याचे संदर्भ, त्यातील व्यथा, भावना, संवेदना या बऱ्याच प्रमाणात आपल्याशीही आयडेंटिफाय होऊ शकतात किंवा होतात. काही लोक देवळात बसतात, काही मद्यालयात, काही लोकांमध्ये मिसळतात तर काही कायम व्यग्र राहायचा प्रयत्न करतात. या सर्वाच्या मागे 'आपल्याला हव्या तशा परिस्थितीत राहण्याची व मनः शांती मिळवण्याची' इच्छा असते. कारण माणूस जीवनातील अनेक कटकटींनी त्रासलेला असतो. अशा वेळेस आपापले मार्ग सुचतात. यातील एक मार्ग आहे गजलेचा आस्वाद घेणे! कारण गजल या काव्याची धुंदी चढू शकते. त्यात माणूस हरवू शकतो. काही काळ नित्य रहाटगाडग्यापासून दूर जाऊ शकतो. गजल हे काव्य ती रचणाऱ्याला तसेच आस्वादकालाही एक वेगळा आनंद देते. हा आनंद फक्त जाणवता येतो. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखादा शेर आपल्याला आठवतो व आपल्या मनाच्या मदतीला धावतो. गजल रचणे यात खूप वेळही चांगला जातो. आस्वादामुळेही एक हक्काचा मार्ग उपलब्ध होतो.
मात्र, हे सगळे होण्यासाठी 'गजलच' का, 'एकंदरच कविता' का याबाबत मते पुढे दिली आहेत.
Wednesday, 24 October 2018
गझल २३
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment