Friday, 26 October 2018

गझल ४

* तंत्र शिकणे
*तंत्रावर हुकुमत येत आहे याचा आनंद झाल्यामुळे अधिकाधिक गझला रचत राहणे
*सफाई येणे
*त्यानंतर आशयाच्या बाबतीत, म्हणजे त्याचा सच्चेपणा, तीव्रता, प्रभावी मांडणी, अचूक मांडणी याकडे लक्ष जाणे
या व यापुढील प्रक्रियांमध्ये अनेकदा काल्पनिक शेर होऊ शकतात. पण ते वाईट असतात असे नव्हे. जास्तीतजास्त प्रामाणिक शेर होणे हे उद्दिष्ट असले की पुरेसे आहे. 'घिसते घिसते मिट जाता आपने अबस बदला' असे म्हणताना गालिब खरोखरच प्रेयसीच्या (किवा अल्लाह / बादशाहच्या) उंबर्‍यावर डोके घासत नसतो.
एकंदरच महत्वाच्या शायरांची यादी इथे देत आहे.
अमीर खुसरो - १२५३ ते १३२५
मुहम्मद कुतुब शाह - १५६५ ते १६११
वली महम्मद उर्फ़ वली दखनी - १६६७ ते १७०८
मिर्ज़ा मुहम्मद रफ़ी उर्फ़ सौदा - १७१३ ते १७८०
ख्वाजा मीर दर्द - १७२१ ते १७८५
मीर तकी मीर - १७२३ ते १८१०
नज़ीर अकबराबादी - १७४० ते १८३०
बहादुरशहा जफ़र - १७५५ ते १८६२ ( सम्राट जफ़र )
आतिश - १७७८ ते १८४६
ज़ौक - १७८९ ते १८५४
गालिब - १७९६ ते १८६९
ब्रिज नारायण चकबस्त - १८८२ ते १९२६ (हिंदू शायर )
मोमीन - १८०१ त१ १८५२
अमीर मीनाई - १८२६ ते १९००
दाग देहलवी - १८३१ ते १९०५
अल्ताफ़ हुसेन उर्फ़ हाली - १८३७ ते १९१४
डॊ. रघुपती सहाय उर्फ़ फ़िराक गोरखपुरी - १८९६ ते १९८२ (हिंदू शायर )
हसरत मोहानी - १८७५ ते १९५२
सर मुहम्मद इक्बाल - १८७७ ते १९३८
जिगर मुरादाबादी - १८९० ते १९६०
जोश मलिहाबादी - १८९८ ते १९८२
फ़ैज़ अहमद फ़ैज़ - १९११ ते १९८४
अलि सरदार जाफ़री - १९१३ ते २०००
जॊं निसार अख्तर - १९१४ ते १९७६
शकील बदायुनी - १९१६ ते १९७०
कैफ़ी आज़मी - १९१८ ते २००२
कतील शिफ़ाई - १९१९ ते २००१
साहिर लुधियानवी - १९२१ ते १९८०
अहमद फ़राज़ - १९३१ ते २००८
या शिवाय मजाज व गुलज़ार हेही दोन महत्वाचे कवी!
दशकानुदशके सांस्कृतिक, सामाजिक पातळ्यांवर बदलत्या अवस्था पाहत पाहत उर्दू गज़ल आता भारतात रुजलेली होती मात्र, बरीच बदलली होती. मीर, गालिबच्या काळातील प्रेम, व्यथा या जरी तशाच राहिल्या असल्या तरी बयाच मोठ्या प्रमाणावर सामाजिक विषय, राजकीय परिस्थितीचे उल्लेख येऊ लागले होते.
याला कारणे अनेक होती. इंग्रजांची राजवट, स्वातंत्र्यलढा, शासनप्रणाली बदलणे वगैरे वगैरे! समाज आधीहून थोडा तरी मुक्त झालेला असावा. अनेक स्त्रियांचे काव्यही दिसू लागले.
एकंदर, आपण पाहिले की कितीतरी वळणे घेत, चढ उतार सहन करत, धक्के खात बिचारी गज़ल शेवटी आम जनतेमधे रुजली.
याचे एकमेव आणि एकमेव कारण हेच की गज़लेत ’आपल्या भावना प्रकट झाल्या’ याचा अनुभव रसिकाला येतो.
गज़ल दैनंदिन आयुष्यातील छोट्या मोठ्या अनुभुतींवर केले जाणारे तंत्रशुद्ध काव्य आहे.
गज़ल हे तुमचे, माझे, कुठल्याही सामान्यातील सामान्य माणसाचे काव्य आहे.
गज़लेत मनुष्याच्या जीवनामधील अत्यंत मूलभूत भावनांवर, घटकांवर भाष्य केलेले आढळते. जसे प्रेम, विरह, दु:ख, संवादात्मकता, आर्तता, व्याकुळता इत्यादी!
आता गज़ल उर्दूमधून उर्दूच्या इतर बहिणींकडे स्थलांतरित व्हायला लागली. हिंदी, बंगाली, गुजराती व
मराठी.....

No comments:

Post a Comment