भटांची मराठी गझल हे काही प्रमाणात जोमदार काव्य आहे असे माझे स्पष्ट मत आहे. त्यात उर्दू गझलेतील तरलता, नाट्यमयता, मृदुता मला तरी अनेकदा फारशी जाणवत नाही. आश्चर्यकारकरीत्या, त्यांनी लिहीलेली गझलतंत्रातील गीते मात्र अत्यंत तरल आहेत. मल्मली तारुण्य, मालवुन टाक दीप सारखी!
त्यांच्या काव्यात अनेकदा 'हाय, गडे' असे शब्द येतात. ते अपरिहार्य आहेत असेही मला वाटत नाही. एखादा मिसरा कंसात का असावा हे त्यांनी बहुधा जाहीर नोंदवलेले नसावे. त्यांच्या अनेक कल्पना मला लक्षात येत नाहीत. यावर आणखीन एकांनीही असे लिहीले आहे म्हणून मी त्यांनीच दिलेली उदाहरणे वापरतो. विजांशी ओठांनी झिम्मा खेळणे, हाती उन्हे धरणे अशा कल्पना निदान माझ्या मनाला नेमकेपणाने जाणवत नाहीत. अन्यायाविरुद्ध उभे राहणे हे अनेकदा त्यांच्या गझलेचे स्वरूप भासते.
याचवेळेस, फक्त त्यांच्यामुळेच मराठीला शुद्ध आणि सशक्त गझल मिळाली आहे. अनेकांना 'गझल' म्हणजे काय आणि कशी रचायची याचे धडे त्यांनी दिलेले आहेत. त्याच्या अनेक प्रतिमा आज अनेक कवी तशाच्या तशा वापरतानाही दिसतात. त्यांच्या काव्याचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. त्यांच्या कित्येक गझला मुशायर्याची शान असणार हे नक्कीच! आज होणारे गझलोत्सव, गझलांजली, गझल सहयोग सारखे मोठे व अत्यंत छोटे कार्यक्रम हे केवळ भटांनी गझल शिकवली म्हणूनच होऊ शकतात. एक मात्र खरे आहे, मी जरी त्यांना भेटण्याइतका भाग्यवान नसलो तरीही मिळालेल्या माहितीनुसार .... 'ते जसे होते... तशीच गझल त्यांनी रचली'... !
Friday, 26 October 2018
गझल ६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment